शिक्षक बदली बाबत महत्वाचा आजचा शासन निर्णय

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करित असताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र. १ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/ निवेदने शासनास प्राप्त झाले आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि. १३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४. २०२५ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना / निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र.३ येथील शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला आहे. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय क्रमांकः आंजिव – २०२३/प्र.क्र.११७ /आस्था-१४

शासन निर्णय:-

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण करण्यात येत आहे.

१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ मधील ६(८) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. २) आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी :-

२.१ ज्या शिक्षक कर्मचान्याला आंतर जिल्हा बदली हवी आहे, अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा

परिषदेमध्ये त्या वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे. तसेच ५ तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या ५ वर्षाच्या कालावधीत संबंधित

शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष

संवर्ग भाग १ व भाग २ मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ३ वर्षांची असेल.

२.२ मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.

२.३ जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत / किंवा प्राथमिक पदवीधर पदावर पदस्थापना झाल्याने वेतनोन्नती झाली असल्यास अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत तसेच वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांसाठी विचार केला जाईल. २.४ ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी

तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल. २.५ आंतरजिल्हा बदली प्रकरणांत ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर ( बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाहीत, अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल.

२.६ यासंदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करतांना जास्तीत

जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील. याकरिता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

२.७ प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडलेला आहे. या अर्जासोबत

खालील कागदपत्रे जोडावीत.

शासन निर्णय क्रमांक: आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७ /आस्था-१४

शासन निर्णय वाचता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *